Posts

Showing posts from January, 2020

माणसासम वागणे...!!

लातुर मधील लोकहो, समजा जर तुमच्या घरासमोरील कचरा उचललाच गेला नाही...रोज घरातून निर्माण होणारा कचरा रोजच्यारोज तसाच साचत चाललाय, गल्लीबोळात सगळ्यांच्या घरासमोर कचऱ्याचे ढीग च्या ढिग जमा झालेत, प्रचंड दुर्गंधी पसरली आहे... माशा, मच्छर यांच प्रमाण वाढलय..रस्त्यावर चालताना देखील नाकाला हात लावून साचलेल्या कचऱ्यातून वाट काढत चालाव लागतय... नाल्या ओसंडून वाहत आहेत, नाल्यातील गाळ रस्त्यावर आला आहे...  विचार करा जर अशी स्थिती लातूर ची झाली तर...??  आता तुम्हाला वाटेल की अशी स्थिती कशाला उद्भवेल... रोज कचरा उचलणारे कर्मचारी येतात कचरा घेऊन जातात... सफाई कर्मचारी रोड स्वच्छ करताता मग कशी होईल अशी लातुर ची दयनीय अवस्था. पण लातुरकर हो, अशी वेळ आपल्यावर यायला वेळ लागणार नाही कारण लातुर मधील कचरा व्यवस्थापन करणारे आणि सफाई कर्मचारी यांची फार दैना झाली आहे हे लोक प्रचंड हलाखीत त्यांच जिवन व्यथीत करत आहेत... तर त्यांच्या जीवनाच्या अशा दयनीय अवस्थेला जबाबदार आहे इथल प्रशासन... कारण इथल प्रशासन हे या लातुर ला स्वच्छ व निरोगी ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे... त्यांची कुचेष्टा करत आहे...

बंदिस्त भारतीय संस्कृती

                  "बंदिस्त भारतीय संस्कृती " भारतीय संस्कृती ही स्त्री पुरुष समानतेला पोषक आहे अस मला वाटत नाही. भारतीय संस्कृती ही खूप संकुचित आहे मुळातच इथली संस्कृती ही पुरूषप्रधान आहे...आणि इथूनच मग स्त्री च्या इज्जतीचे आणि तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचे सर्व प्रश्न निर्माण होतात. भारतीय संस्कृती मध्ये फक्त आई आणि बहीण ह्या दोनच स्त्रियांचा सन्मान करायला शिकवतात, *माझ्या दृष्टीकोनातून आपल्या संस्कृतीत स्त्री ची नव्हे तर फक्त या दोन नात्यांची इज्जत आणि सन्मान करायला शिकवतात...            ती तुझी बहीण असती तर, ती तुझी आई असती तर असच बघितला असतास का, असच बोलला असतास का वगैरे वगैरे... हे सर्व वाक्य आपण ऐकलेच असतील तर ही आहे आपली संस्कृती, ही आहे आपली शिकवण जी की फक्त घरातल्या आई आणि बहिणीचाच सन्मान करायला शिकवते... म्हणून मी ह्या अशा संस्कृती ला बंदिस्त म्हणतो संकुचित म्हणतो आणि का म्हणू नये.  आपली संस्कृती आणि शिकवण ही शिवाजी महाराज आणि गौतम बुद्ध यांची असली पाहिजे, कारण त्यांच्या दृष्टीने सर्वच स्त्री ही समान...

मी दाभोळकर व्हाव...!!

 मी ही दाभोळकर व्हाव...!! त्यांच्या रक्ताचा एक एक थेंब सार्थ व्हावा, समाजातील मनामनात विवेक जागावा, निर्भय, नीतिमान समाज घडवावा, त्यासाठी मी ही दाभोळकर व्हाव...!! घेऊनी खांद्यावर पताका विवेकाची, अंधाऱ्या पथावर, निर्भय, निडर चालाव, त्यासाठी मी ही दाभोळकर व्हाव...!! उपहासाचे मन ते भेदभावाचे आगार, एकजूट होऊ आपण करू नव समाज निर्माण, त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!! जखडले ते मन त्या अंधश्रद्धा लय कठीण, द्यावयास त्यास उत्तर, पटवून देऊ तयांना मन मनाचे आजार, त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!! भिती ही मरणाची नाही किंचीत ही आम्हा, विवेकी वारकरी आम्ही आमचा तुका सोयरा, गोळीला तुमच्या आमचे आभंग उत्तर, त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!! गांधी-आंबेडकरांचा समाज दृष्टिकोन, अंधश्रद्धा त्यामधील च एक अडचण, ती होऊन दुर मग संविधान समाज, बघा कसा घडणार, त्यासाठी मी दाभोळकर व्हाव त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!!           -Budhisar Shikare