Posts

Showing posts from March, 2022

बुद्ध दृष्टी - 2

"अंगुलीमाल" हा भयंकर क्रूरकर्मा होता...लोकांची हत्या करून त्यांची बोटे छाटून तो त्या बोटांची माळ बनवत असे... प्रचंड दहशत या अंगुलीमाल ची पसरली होती... पण जेंव्हा या बद्दल बुद्धांना जेंव्हा समजल तेंव्हा बुद्ध लगेच त्याच्या कडे जाणण्यासाठी निघाले... त्याची बुद्धांना दया आली म्हणून बुद्ध त्याच्या दिशेने गेले... बुद्धांना पाहताच तो त्यांच्या दिशेने धावत गेला आणि शस्त्र उगारले पण, बुद्धांच्या जवळ जाताच त्यांच्या चेहर्‍यावरील मैत्री आणि करूणामय भाव पाहुन तो शांत झाला... बुद्धांनी त्याला उपदेश केला आणि त्या क्रूरकर्मा अंगुलीमाला ने शस्त्र खाली टाकले आणि तथागत बुद्धांना शरण गेला...  शेकडो लोकांची हत्या करणारा हा व्यक्ती तरी देखील बुद्धांनी त्याला माफ केल आणि त्याला उपदेश केला... आणि त्याला भिख्खू संघात देखील घेतल... याच कारण अस की, मुळातच त्या अंगुलीमाच्या मनामध्ये कुठे तरी करूणे चे बिज होतेच... खरंतर आपल्या सर्वांमध्ये उपजत करूणा आणि मैत्रीभाव असतोच... पण त्याचा शोध आपण कधी घेतलेलाच नसतो...म्हणूनच तर वाईट मार्ग आपण स्विकारत असतो... तुम्ही बघा प्रत्येक व्यसनी व्यक्ती कुठल्या ना कुठल्...

बुद्ध दृष्टी

* बुद्ध दृष्टी * सुखाच्या शोधासाठी मनुष्य आजन्म कष्ट उपसतो... धनसंचय करण्याकरिता तो अमाप कष्ट करतो...या सर्व कष्टाच उद्दिष्ट एकच असत ते म्हणजे "सुख मिळवणे"... आयुष्यभर आपल्याला क्षणिक सुख वारंवार मिळत असतात... पण प्रश्न आहे तो मनाच्या आत्मिक सुखाचा? जोपर्यंत मनाचे आत्मिक सुख मिळत नाही तो पर्यंत क्षणिक सुख हे निर्थक आहे... म्हणूनच तर त्याला क्षणिक म्हटल गेलय. दुःख हे आपल्या सोबतच जन्म घेत असत, "दुःख ही परग्रहावरील वस्तू नाही ती आपल्या मनातील एक भावना आहे, एक अवस्था आहे." राजघराण्यात जन्म झाला तरी देखील मिळत असलेली राजगादी त्यागून... संसारचा त्याग करुन... धनसंपत्ती चा त्याग करून तु दुखाःच मुळ शोधण्यासाठी गेलास. पैसा जवळ असेल तर हव ते सुख मी विकत घेईन...हा आमचा भ्रम तु सुरवातीलाच तोडुन टाकलास. मुळातच पैसा ही शौक पुर्ण करण्याची वस्तू आहे आत्मिक सुख देण्याची नव्हे. समस्त मानव जात "सुख" मिळवण्यासाठी ज्या गोष्टी मिळवते, ज्या गोष्टींकडे आयुष्यभर धावत असते त्याच गोष्टींकडे पाठ करूश तु "प्रवाहाच्या विरोधातला" हा प्रवास सुरू केलास. बोधी प्राप्त झाल्यान...